Top News

ब्रेकींग I एसटी बस व दुचाकीच्या भीषण अपघातात जळगावातील तरुण ठार, दोन जण गंभीर

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
भुसावळकडे येणाऱ्या रस्त्यावर बामणोद-पाडळसा दरम्यान रविवारी संध्याकाळी ६ वाजता एसटी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मयूर अण्णा गवळी (रा. जळगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मयूर गवळी आपल्या मित्रांसह – जयेश पाटील आणि गोयर – यांच्यासोबत बामणोद येथे कामानिमित्त गेला होता. काम आटोपून दुचाकीने परतत असताना एका वळणावर त्यांच्या दुचाकीला एसटी बसने जोरदार धडक दिली. या धडकेत मयूरच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात जयेश पाटील आणि गोयर हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर तिन्ही जणांना तत्काळ भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले होते.

जळगावात शोककळा; मनमिळाऊ मयूरचे दुर्दैवी निधन

मयूर अण्णा गवळी याचे जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाजवळ महाबासुंदी चहाचे दुकान होते. त्याचा हसतमुख स्वभाव, मदतीची वृत्ती आणि दांडगा जनसंपर्क यामुळे तो सर्वांमध्ये अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या अकाली निधनाने जळगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने मित्र, नातेवाईक आणि नागरिक घटनास्थळी धावले. मयूरच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी आणि तीन बहिणी असा परिवार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने